Breaking

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

२१ वर्षीय युवकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; अकलूज पोलिसांनी तीन मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.


​अकलूज: निरा नदीपात्रातील मेघराज युवराज हिलाल (वय २१, रा. काझी गल्ली, अकलूज) या युवकाच्या खून प्रकरणाचा अकलूज पोलिसांनी यशस्वीरीत्या तपास पूर्ण करून तीन आरोपींना अटक केली आहे.दिनांक २२/१०/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता शनी घाट, निरा नदीच्या पात्रात मेघराज हिलाल याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला अपमृत्यू म्हणून नोंद झाली. ​पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे हा घातपात असल्याचे सिद्ध केले.​तपासात निष्पन्न झाले की, दिनांक २१/१०/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजता मयत आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता.​या वादातून आरोपींनी मेघराजला जबरदस्तीने निरा नदीच्या पात्रात नेले आणि पाण्यात बुडवून त्याचा खून केला.

१.  रोहीत रघुनाथ क्षत्रीय

२.  राहूल रघुनाथ क्षत्रीय दोघेही ( रा. काझी गल्ली, अकलूज)

३.  रोहन सुनिल शिंदे (रा. काझी गल्ली, अकलूज)

​गुन्हा केल्यापासून परागंदा झालेल्या रोहीत क्षत्रीय आणि राहूल क्षत्रीय यांना वाशी येथून, तर रोहन शिंदे याला अकलूज येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक. अतुल कुलकर्णी साो, मा. अपर पोलीस अधिक्षक, प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग,संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकॉ/९७८ अमोल बकाल, पोहेकों / १४०७ समीर पठाण, पोहेकॉ १५८९/शिवकुमार मदभावी, पोहेकॉ/१०९८ विक्रम घाटगे, पोहेकॉ / १५३३ तुषार गाडे, पोहेकॉ/१८२७ कंठोळी, पो कॉ/५१ रणजीत जगताप यांनी केलेली आहे.